spot_img
spot_img
spot_img

धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा हा लोकशाहीचा विजय -दीप्ती चवधरी

शबनम न्यूज | प्रतिनिधी

गेली १२ वर्षे मनमानी व हुकुमशाही पद्धतीने देशाचा कारभार करणाऱ्या केंद्रातील भाजपच्या मोदी सरकारला अखेरीस विद्यार्थ्यांच्या प्रखर आंदोलनामुळे झुकावे लागले हा लोकशाहीचा मोठा विजय आहे. नीट पेपर फुटी मध्ये केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांना अखेरीस राजीनामा द्याला लागला हि निश्चितच ऐतिहासिक घटना आहे. तरुण विद्यार्थ्यांच्या बरोबरच लोकसभेतील विरोधी पक्षनेते खा. राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली कॉंग्रेस पक्षाने देखील संसदेत आणि संसदे बाहेर मोठा आवाज उठवला याच्या एकत्रित परिणामामुळे अखेरीस मोदी सरकारला झुकावे लागले. याबद्दल विद्यार्थ्यांचे अभिनंदन तर केलेच पाहिजे शिवाय पालकांचे हि आभार मानले पाहिजे. गेली १२ वर्षे मोदी सरकारने देशात जे भीतीचे वातावरण निर्माण केले त्याचा चक्काचूर या विद्यार्थी आंदोलनाने झाला. ‘प्रधान गेले आता पंतप्रधान हि जातील’ हि भावना जनतेते व तरुणांमध्ये निर्माण झाली आहे, भय संपले आहे आणि लोकशाहीचा विजय झाला आहे हे या यशस्वी आंदोलनातून दिसून येते.

कॉंग्रेस भवन मध्ये विजयोत्सव
यावेळी शहराध्यक्ष दीप्ती चवधरी, नगरसेवक रफिक शेख, अल्पसंख्याक विभागाचे प्रदेश उपाध्यक्ष उस्मानशेठ तांबोळी, महिला अध्यक्षा स्वातीताई शिंदे, चंद्रशेखर कपोते, राजेंद्र भुतडा, विशाल जाधव, राहुल वंजारी गुलामहुसेन खान, लतेंद्र भिंगारे, हर्षद हांडे, फैयाज शेख, चैतन्य पुरंदरे, अमित कांबळे, प्रदीप परदेशी,चेतन अगरवाल, गणेश गुगळे,समद शेख,ॲड राजश्री अडसूळ, राजश्री चव्हाण,ऋषिकेश जाधव संतोष देसाई, रमेश सोनकांबळे राजेंद्र भुतडा, अविनाश अडसूळ इत्यादी.

 

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!