• मुख्यपृष्ठ
  • मनोरंजन
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम
  • शेत-शिवार
  • नोकरी विषयक
  • आणखी
    • पुणे
    • धार्मिक
    • संपादकीय
Search
Logo
  • Blog
  • About
  • Contact
spot_img
Logo
Logo
spot_img
  • मुख्यपृष्ठ
  • मनोरंजन
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम
  • शेत-शिवार
  • नोकरी विषयक
  • आणखी
    • पुणे
    • धार्मिक
    • संपादकीय
  • मुख्यपृष्ठ
  • मनोरंजन
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम
  • शेत-शिवार
  • नोकरी विषयक
  • आणखी
    • पुणे
    • धार्मिक
    • संपादकीय
spot_img

माणसाला समृद्ध करणार्‍या दिवाळी अंकांची परंपरा जपावी – अभिनेत्री डॉ. निशिगंधा वाड

Shabnam News
By Shabnam News
July 10, 2025
WhatsApp
Facebook
Copy URL
Telegram
Twitter

    शबनम न्यूज | प्रतिनिधी

    ‘आजच्या पिढीत वाचनसंस्कृती रुजलेली नाही. या पिढीने किती मराठी पुस्तके वाचली आहेत किंवा किती मराठी लेखकांची नावे त्यांना माहीत आहेत याची शंका वाटते. त्यामुळे दिवाळी अंकासारखी ज्ञानगंगा जपणे, आपली अभिरुची संपन्नता जपणे गरजेचे आहे,’ असे मत अभिनेत्री डॉ. निशिगंधा वाड यांनी व्यक्त केले.

    स्वर्गवासी कमलाबाई रसिकलाल धारिवाल पुरस्कृत छंदश्री आंतरराष्ट्रीय दिवाळी अंक स्पर्धेच्या पुरस्कार वितरणप्रसंगी त्या बोलत होत्या. याप्रसंगी ज्येष्ठ साहित्यिक व माजी संमेलनाध्यक्ष डॉ. भारत सासणे, ज्येष्ठ लेखिका डॉ. सिसिलिया कार्व्हालो, अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, स्पर्धेचे परीक्षक माधव राजगुरू, संयोजक दिनकर शिलेदार, प्राजक्ता शिलेदार आदी उपस्थित होते. यावेळी विविध विभागांमध्ये एकूण ४२ पुरस्कार प्रदान करण्यात आले.

    निशिगंधा वाड म्हणाल्या, “आईमुळे मीही लिहिते झाले. तिच्या पहिल्या लेखनाचे आम्ही वाचक असायचो. माझे शिक्षण इंग्रजी माध्यमातून झाले असले तरी माझी पहिली कविता मराठीत केली होती. दिवाळी अंक माणसाला अधिक समृद्ध करतात.”

    प्रा. जोशी म्हणाले, “दिवाळी अंक ही लेखकांसाठीची प्रयोगशाळा आहे. दिवाळी अंकांनी लेखकांसह संपादकांना आणि चित्रकारांनाही प्रतिष्ठा मिळवून दिली. आज दिवाळी अंकांची संख्या वाढत असली तरी त्यांची गुणवत्ता हा चिंतेचा विषय आहे.”

    भारत सासणे म्हणाले, “दिवाळी अंकांची ही परंपरा आंतरराष्ट्रीय स्तरावर गेली असून, मराठी व बंगाली भाषेत विशेषांक निघतात. अनेक आव्हानांवर मात करून ही परंपरा जपणाऱ्या संपादकांना प्रोत्साहन देणारा हा उपक्रम आहे.”

    ‘साहित्याला कुठलाही धर्म नसतो,’ हा मुद्दा अधोरेखित करीत डॉ. कार्व्हालो यांनी, नाताळ तसेच ईदनिमित्त प्रकाशित होणाऱ्या अंकांचाही या पुरस्कारांमध्ये समावेश केल्याबद्दल आनंद व्यक्त केला. अन्वय बेंद्रे यांनी सूत्रसंचालन केले.

    You Tube

    This error message is only visible to WordPress admins

    Error 403: The request cannot be completed because you have exceeded your quota..

    Domain code: youtube.quota
    Reason code: quotaExceeded

    Error: No videos found.

    Make sure this is a valid channel ID and that the channel has videos available on youtube.com.

    Related Articles

    ताज्या बातम्या

    बुद्ध तत्त्वज्ञान आणि मूल्यांचा उद्योग, व्यवस्थापनात उपयोग करा – डॉ. प्रशांत पानसरे

    क्राईम

    बनावट आरटीओ वेबसाईट व लिंकपासून सावध राहा

    क्राईम

    पिंपरी – चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात कलम 37 (1) व (3) आदेश जारी

    ताज्या बातम्या

    ताज्या बातम्या

    बुद्ध तत्त्वज्ञान आणि मूल्यांचा उद्योग, व्यवस्थापनात उपयोग करा – डॉ. प्रशांत पानसरे

    क्राईम

    बनावट आरटीओ वेबसाईट व लिंकपासून सावध राहा

    क्राईम

    पिंपरी – चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात कलम 37 (1) व (3) आदेश जारी

    ताज्या बातम्या

    पर्यटन संचालनालयातर्फे सात दिवसीय ‘टुरिस्ट गाईड ट्रेनिंग’

    ताज्या बातम्या

    गॅस सिलेंडरचे वितरण फक्त OTP द्वारेच होणार ; ९६ तासांत होणार घरपोच

    Load more
    Logo

    Contact us: [email protected]

    या न्युज पोर्टल वरील प्रकाशित झालेल्या बातम्या, लेखाशी मुख्य संपादक सहमत असतीलच असे नाही. काही वाद उद्भभवल्यास पुणे न्यायालया अंतर्गत राहील अन्य कुठेही नाही

    Facebook
    Instagram
    Twitter
    WhatsApp
    Youtube

    2025 © Copyright - shabnamnewsonline.in| All rights reserved.

    Website developed by Softisky Media Solution | 9764331134

    error: Content is protected !!