शबनम न्यूज | प्रतिनिधी
पिंपरी परिसरातील विस्कळीत पाणीपुरवठ्यामुळे त्रस्त झालेल्या नागरिकांच्या प्रश्नावर डब्बू आसवानी यांनी आज, ३१ जानेवारी २०२६ रोजी आक्रमक पवित्रा घेत प्रशासकीय अधिकाऱ्यांची तातडीची बैठक घेत प्रशासनाला येत्या दोन दिवसांत पाणीपुरवठा सुरळीत करण्याचा अल्टिमेटम दिला आहे. गेल्या १५ ते २० दिवसांपासून सी ब्लॉक, पीडब्लूडी (PWD), शास्त्री नगर आणि सुभाष नगर यांसारख्या भागांत अत्यंत कमी दाबाने पाणी येत असल्याने नागरिकांचे हाल होत आहेत. अधिकाऱ्यांकडून केवळ तांत्रिक कारणे दिली जात असल्याने संताप व्यक्त करत, आसवानी यांनी जर या मुदतीत परिस्थिती सुधारली नाही, तर प्रशासनाविरुद्ध तीव्र ‘हंडा मोर्चा’ काढण्यात येईल, असा स्पष्ट इशारा त्यांनी या बैठकीद्वारे दिला आहे.


