शबनम न्यूज | प्रतिनिधी
वाहतूक शाखेच्या ३१ विभागातील पोलीस निरीक्षक, तसेच सहायक निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या करण्याचे आदेश पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिले. शहरातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी पोलिसांकडून उपाययोजना करण्यात येत आहे. पावसाळ्यात पाणी साचल्यानंतर वाहतूक विस्कळीत होते.
कात्रज, बाणेर, गणेशखिंड रस्ता, तसेच शहरातील वेगवेगळ्या भागांतील वाहतूक कोंडी विचारात घेता वाहतूक शाखेतील ३१ पाेलीस निरीक्षक, सहायक निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या करण्याचे आदेश पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिले आहे.
वाहतूक शाखेतील पोलीस निरीक्षक, सहायक निरीक्षक ज्या भागात राहायला आहेत. त्या भागात त्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.वाहतूक कोंडी, तसेच विस्कळीत झाल्यास संबंधित पोलीस निरीक्षक, सहायक निरीक्षकांनी त्वरित तेथे पोहचावे, या विचाराने अंतर्गत बदल्या करण्यात आल्या आहेत. अपघाताची घटना घडल्यास पोलीस निरीक्षकांनी तातडीने घटनास्थळी भेट द्यावी, असे पोलीस आयुक्तांनी दिलेल्या आदेशात म्हटले आहे.